अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील आडसूळ गावात भर बाजारात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ग्रामपंचायतीकडे वारंवार निवेदने देऊनही उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. दक्षिणेकडील भागात सांडपाण्याचा निचरा न झाल्याने परिसरात दुर्गंधी व आरोग्यधोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. करपावती भरूनही कोणतीच सुविधा न मिळाल्याने ग्रामस्थ विलास रायबोले यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.