लातूर -रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील बंद पडलेला पनगेश्वर साखर कारखाना मंत्री पंकजा मुंडे यांनी आ. नमिता मुंदडा यांना विकल्याने तो पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या कारखान्याकडे शेतकरी व कामगारांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने हे थकित पैसे त्वरित अदा करण्यात यावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.