कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या चाकातील ब्रेक लाइनर जाम होऊन अचानक धूर आल्याने शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास काही काळ ही गाडी तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकात थांबऊन ठेवण्यात आली होती. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर ही गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.