महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर शेतीपिके तसेच नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आज दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार किसनराव वानखडे यांनी महागाव तालुक्यातील टेंभी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. टेंभी येथील शेतीचे तसेच घरांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून आमदार वानखडे यांनी शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शेतकरी व बाधित नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.