लातूर, दि. २५ : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आगामी गणेशोत्सवात वाहतूक नियम जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.