शेंबवणे पैकी गुरववाडी येथे लघुपाटबंधारे तलावाचे काम सुरु असताना अतीवृष्टीमुळे तलावाचा भराव वाहून गेला. तलावातील पाणी व गाळ शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने सुमारे ३० ते ३५ एकरातील भातशेती व ऊसाचे मोठे नुकसान .माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आज शुक्रवार १८ जुलै दुपारी तीन वाजता या भागाला भेट दिली व नुकसान भरपाईची मागणी केली.