Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
छत्रपती संभाजीनगर:खानावळीमध्ये ओळख होऊन ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं.मात्र ज्या खानावळीत मैत्री झाली त्याच खानावळीत किरकोळ कारणावरून मित्राने मित्राचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवर असलेल्या खानावळीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खून करण्यासाठी वापरलेला चाकू श्वानाने शोधून काढला.