महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४' हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले,कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांचेमध्ये या विधेयका विरोधात प्रचंड तीव्र असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने हे विधेयक तातडीने रद्द करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.