भटाळी येथील कावेरी सी 5 कंपनीत काम करणा_या 300 हून अधिक कामगारांना नियमानुसार वेतन देत नसल्याचा आणि पीएफ रक्कम भरत नसल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय केला जात आहे. या संदर्भात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देत कामगार आयुक्त कार्यालयाला शिवसेना स्टाईल मध्ये टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी आज दि 26 आगस्ट ला 4 वाजता पत्रकार परिषदेत दिला आहे.