सततच्या अतिवृष्टीजन्य पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होऊन संपूर्ण आता तोंडाशी आलेलं पीक है शेत जमीन खरडून जाऊन वाया गेलं सोयाबीनवर येलो मौजाक सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन ते पूर्ण खराब झालेलं आहे. त्याचबरोबर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर ,संत्रा,सोयाबीन ,मका ,ज्वारी यासारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालेला आहे .त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षा मार्फत तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.