देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. चार शिक्षकांच्या बदलीनंतर शाळेत एकही शिक्षक रुजू न झाल्याने 130 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले होते. या विरोधात पालकांनी शाळेला कुलूप ठोकत निषेध नोंदविला होता. तर आज ता. 10 बुधवारला सकाळी 11.30 वाजता युव