पुढल्या वर्षी लवकर याचा.. जयघोष करत संततधार पावसात दीड दिवसाच्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी मिरवणुका करण्यात आला. जिल्ह्यातील १३हजार ८४४ घरगुती व सात सार्वजनिक गणपतींचे समुद्र, नदीत विसर्जन करण्यात आले. किनाऱ्यावर गर्दी होऊ नये आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दलातर्फे ग्रामीण व शहरी भागात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.