सांगोला तालुक्यातील एखतपूर, घायटी, चिंचोली या गावाच्या परिसरात शुक्रवारपासून लांडग्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत लांडग्याने ९ लोकांवर हल्ला करून जखमी केले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांनी केले आहे. त्यांनी आज 24 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधला आहे.