शेतकरी संकटात; सरकारकडून बऱ्या मदतीच्या अपेक्षा – बाळासाहेब थोरात राज्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीसह विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतीची पिके पाण्याखाली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.