आडोळ येथील रस्त्यासाठी नागरिकांनी 15 ऑगस्ट रोजी पूर्णा नदी काठावर जलसमाधी आंदोलन केले होते. यावेळी गौलखेड येथील दिवंगत विनोद पवार यांनी या लढ्यासाठी पूर्णा नदीत उडी घेत जलसमाधी घेतली होती.आज 24 ऑगस्टला दुपारी शिवसेना उबाठा प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी गौलखेड येथे मृतक विनोद पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.