धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरून. नगावजवळ एका भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पाच मेंढ्या वाहनाखाली चिरडून जागीच ठार झाल्या, तर आणखी पाच ते सहा मेंढ्या गंभीर जखमी अवस्थेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गरीब मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाला आहे.