गडचिरोली शहरातील रामनगर येथे होळीच्या पावन प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी धार्मिक विधिवत अग्निपूजन केले.होळीच्या पवित्र अग्नीतून निराशा, दारिद्र्य व आळस यांचे दहन होऊन सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य व शांती नांदो, अशी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.