पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततदार सुरू असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून वीस हजार क्युसेक पाड्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे. सूर्या नदीच्या पाणी पातळीत देखील यामुळे वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.