श्री गणेशोत्सव काळात रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण बंदी लागू केली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून हर्बल, नैसर्गिक व जैविक गुलालाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता केले आहे.