गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात. या दिवशी महिला पार्वती मातेची पूजा करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान शहरातील पवन तलाव येथे हरिततालिका पर्वावर गौरीचे विसर्जन करण्यात आले. सरिता चव्हाण, उमा चव्हाण, चेतना डोमळे, कोमल शेन्डे, ज्योती येरपुडे, टिना शेन्डे, तृप्ती रोकडे , सुनिता बरीयेकर आदी महीला प्रामुख्याने उपस्थित होत्या.