बुलढाणा शहरात २०१३ साली जनतेच्या प्रश्नांसाठी अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल १२ वर्षे न्यायासाठी लढा दिल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.या संपूर्ण लढ्यात ऍड शर्वरी सावजी -तुपकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.