पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी नवी दिल्ली येथे अणू ऊर्जा मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील बाधित आणि पीडित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. कंत्राटी कामगार व स्थानिक भरतीच्या गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्या सोडवण्याबाबत यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी अणू ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिले.