रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई-तेलीवाडी येथे किरकोळ कारणातून एकाच कुटुंबातील चार जणांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवार 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा.सुमारास घडली असून याप्रकरणी तिन जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर सुरेश आंब्रे (45),अमित सुरेश आंब्रे(42) आणि एक महिला (सर्व रा. चांदेराई- तेलीवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात विनोद प्रमोद आंब्रे (50,रा.चांदेराई-तेलीवाडी) यांनी तक्रार दिली