गणपती बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा व सेवा केल्यानंतर दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना जिल्ह्यात भावपूर्ण निरोप देण्यात आला. पालघर, वसई, विरार, बोईसर, डहाणू, जव्हार जिल्ह्यात सर्वत्र तलाव, समुद्रकिनारी, कृत्रिम तलावात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढत त्यांना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा गजर करत जिल्ह्यात गणरायाला निरोप देण्यात आला, विसर्जन स्थळनागरिकांची गर्दी पहावयास मिळाली.