संविधान, लोकतंत्र आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी भारत मुक्ती मोर्चाने चरणबद्ध आंदोलन सुरू केले असून, नागरिकांच्या मताधिकारांना मौलिक अधिकार मानून संविधान व लोकतंत्राच्या रक्षणासाठी तसेच बहुजन समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी देशभरातील अन्याय व अत्याचाराविरुद्ध हे आंदोलन राबवले जात आहे. भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछाडा वर्ग (ओबीसी) मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून भारतातील ५६७ जिल्ह्यांत आणि ४५०० तालुक्यांत हे मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले.