राजनी येथील चाळीस ग्रामस्थांनी आज दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान खासदार अमर काळे यांचे निवासस्थान गाठले त्यांची भेट घेतली आणि घडलेली हकीकत विशद केली.. आम्ही काँग्रेसचेच होतो.. आहे आणि राहू ..असे ठामपणे सांगितले.. राजनी हे गाव काँग्रेसमुक्त.. अशा खोट्या अफवा पसरविण्यात आल्याचे सांगून खासदार अमर काळे यांचे हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य मुकेश कराळे यांच्या उपस्थितीत पक्षाचे दुपट्टे गळ्यात घालून निष्ठा कायम असल्याचे ग्रामस्थांनी सर्वा समक्ष जाहीर केले...