नाशिक मध्ये गेल्या अनेक दिवसापासून संतदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांसाठी नाशिक महानगरपालिकेने कोटावधी रुपयांचा निधी व टेंडर काढले असूनही. तो निधी खड्ड्यातच गेल्या असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक कांकडून होत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडू लागले आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.