ढोल ताशांच्या निनाद, पारंपारिक वाद्यांचा गजर, आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष अशा मंगलमय वातावरणात, आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी , सायंकाळी सहा वाजल्यापासून श्री गणेशाचे आगमन अनेक मंडळांनी केले, सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचे आगमन झाले आहे, सायंकाळी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकींनी, शहराला एक वेगळीच स्वरूप दिले,गणपती बाप्पा मोरयाच्या, जयघोषाने वातावरण भारून गेले होते, पावसाची रिमझिम सुरू असतानाही भक्तांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही.