सोलापूरातील संवेदनशील जोडभावी पेठ परिसरात शुक्रवारी सकाळी 11 वाजता पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच “आम्ही सतर्क आहोत” असा ठाम संदेश नागरिकांना देण्यात आला. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.