Download Now Banner

This browser does not support the video element.

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर

Kurla, Mumbai suburban | Sep 4, 2025
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, अशी टीका आज गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us