महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील विधवा महिला शेतकरी सीमा संतोष लहाने यांचा शेत रस्ता अडवल्यामुळे त्यांच्या शेतातील चार एकर तुरीची गंजी पडून राहिली. महागाव तहसील प्रशासन अंमलबजावणी न करून एका विधवा महिला शेतकऱ्याचा अंत पाहत आहे की काय? हा प्रश्न निर्माण झाला असून सदर महिला शेतकऱ्यावर लहान मुलांसह उपासमारीची वेळ आली आहे.