मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे उदगीर - जळकोट मतदार संघातील विविध गावातील पशुधन व पिकांचे मोठे नुकसान झाले होते तर अनेक गावातील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त भागाची मी स्वत: पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना देवुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे प्रशासनास सांगितले होते. त्या अनुषगांने ढोरसांगवी ता.जळकोट येथील शेतकरी बालाजी रावसाहेब पोतणे ( वय ४५ ) हे पुराच्या पाण्यामध्ये वाहुन जावून मृत पावले .