शासनाने नव्याने आणलेल्या जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीसाठी घातक असून, हा कायदा मंजूर झाला तर, महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दल अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी, आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पोवई नाका येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.