महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषदेची प्रभाग रचना करणे अपेक्षित असतानाही बुलडाणा नगर परिषदेने तयार केलेली प्रभाग रचना ही नियमबाह्य व नागरिकांच्या हिताला बाधक असल्याचा आरोप शिवसेना उबाठा प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी आज 1 सप्टेंबर रोजी दुपारी केला आहे.या संदर्भात ॲड.जयश्री शेळके यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे.त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने सुस्पष्ट,न्याय्य व सुयोग्य प्रभाग रचना जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली आहे.