समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला चालना मिळेल. ग्रामीण जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा बळवंत मंगल कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलत होते.