जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.यातूनच दिवसा व रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.सराईत गुन्हेगार, मटका बहाद्दर,जुगारी तसेच सामाजिक शांतता भंग करणाऱ्या वर कारवाया करण्याचा सपाटा पोलिसांनी चालविला आहे.याचाच एक भाग म्हणून 30 ऑगस्ट ला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.