मोताळा तालुक्यातील राजुर घाटात खडकी फाट्याजवळ एस.टी. महामंडळाच्या भरधाव बसखाली १३ मेंढ्या चिरडून ठार झाल्या. तसेच ५ मेंढ्या गंभीर जखमी आहेत. यात वारुळी येथील मेंढपाळ संजय दगडू बिचकुले यांचे मोठे नुकसान झाले आहे. एस.टी. प्रशासनाने संजय बिचकुले यांना नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता व्यक्त केले आहे.