जळगाव शहरातील असोदा रेल्वेउड्डाण पुलाच्या खाली धावत्या रेल्वेखाली अनोळखी प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दरम्यान मयत हे वाल्मीक नगर मधील रहिवासी असल्याचे बुधवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता निष्पन्न झाले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.