आज चंद्रपूर येथील माझ्या निवासस्थानी सहकुटुंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून पूजन केले. 'श्री'च्या आगमनाने संपूर्ण घर भक्तिभावाच्या दिव्य लहरींनी न्हाऊन निघाले. गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे केवळ सण नव्हे; तर विघ्ने दूर करून सुकरतेकडे नेणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दीन-दुर्बल व पीडित जनतेच्या कल्याणासाठी अखंड सेवा करण्याची शक्ती लाभो. महाराष्ट्र सदैव सुजलाम् सुफलाम् राहो, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी केली.