वन्यप्राण्यांकडून शेतपिकांची होणारी नासधुस थांबविण्यासाठी वन्यप्राण्यांना पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडणाऱ्या शासन निर्णयाबद्दल समाधान- राजेश टोपे जालना जिल्हयासह घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांची अक्षरश: नासाडी करुन पिके उध्दवस्त करण्याचा सपाटा वानर,माकडे,राणडुक्कर,हरीण व रुई गाय यांनी लावला आहे.वन्यप्राण्यांचा या उपद्रवामुळे मनुष्य हानी,मालमत्ता नुकसान,प्रचंड आर्थीक व मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे.यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे.डोळयात पाणी आण्याशिवा