अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी व मुलचेरा या पाचही तालुक्यांमध्ये खरीप हंगामाच्या मध्यावर शेतकऱ्यांना युरियाच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी दररोज कृषी केंद्रांसमोर मोठ्या रांगा लावूनही त्यांना खत मिळत नाही. या कमतरतेमुळे काळाबाजाराला ऊत आला असून शेतकऱ्यांची सरळसरळ लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.