आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबियांच्या गणपती बाप्पाचे जड अंतःकरणाने विसर्जन करत, बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गेले सात दिवस घरात अतिशय प्रसन्न व भक्तिमय वातावरण होते. बाप्पाला निरोप देताना, सर्वांचे दुःख, अडी-अडचणी, संकटांचा नाश करून जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व हर्षोल्लास नांदो, अशी प्रार्थना खासदार सुनील तटकरे यांनी केली.