राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर केला आहे.पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.ही परिस्थिती सावरण्याकरता राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले.केंद्र सरकारकडून देखील मदत मिळेल अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली.