कर्जाच्या ओझ्याने आणि अतिवृष्टीच्या तडाख्याने खचलेल्या नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी पुत्र मंगेश मारोती बोरसे यांनी गौरी आगमनाच्या दिवशी जीवन संपवलं. याला हे निर्दयी सरकारच जबाबदार आहे. अतिवृष्टीच्या महापुरात सर्वस्व गमावलेले शेतकरी महिन्याभरापासून भरपाईची वाट पाहत आहे, मात्र हे बेशरम सरकार शेतकऱ्यांच्या मृत्यूचा फक्त तमाशा बघत आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार.