जयगड परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने जिल्हाभर खडबड माजली असतानाच, राकेश जंगम बेपत्ता आणि खून प्रकरणातील हलगर्जीपणाचा आरोप सिद्ध होताच जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली. जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एपीआय कुलदीप पाटील यांची तात्काळ बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.