राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रूपये जमा करण्यात अल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी साडे बारा वाजता सांगितले.