मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट पासून मुंबई येथे मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू करणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उदगीर तालुक्यातील २०० मावळे २७ ऑगस्ट रोजी चार वाजता मुंबईकडे रवाना झाले,उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा बांधव मुंबईला रवाना झाले,खाण्या पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी मावळ्यांनी सोबत,पातेले,गॅस शेगडी,गॅस सिलेंडर व खाण्या पिण्याचे साहित्य घेवून मुंबईला प्रस्थान केले