सोलापूर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे वाढलेल्या पाणीपातळीमुळे तेलगाव व पाथरी गावांमध्ये पाणी शिरले. वाढत्या पुराच्या धोक्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस तसेच ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना गुरुवारी सकाळी 9 वाजेता सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रेस्क्यू दरम्यान बोटी, ट्रॅक्टर व दोरींच्या साहाय्याने महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.