आगामी काळात जिल्ह्यात विविध धार्मिक उत्सव,यात्रा-जत्रा तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम पार पडणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये २७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १ वाजतापासून ते ९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी चार वाजता देण्यात आली.