विरार येथील रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा भाग कोसळून अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. बचाव पथक मार्फत बचाव कार्य राबवून ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांना व मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.